जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष शरद यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मतदानाचे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले की मुलीच्या अब्रूपेक्षाही मताची अब्रू अधिक मोठी आहे.
त्यांनी म्हटले की एकदा मुलीची अब्रू गेली की गाव आणि विभागाची अब्रू जाईल. पण जर एकदा मत विकले गेले तर संपूर्ण देशाची अब्रू जाईल. तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. नंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की आपण जितकं प्रेम आपल्या मुलीवर करता तेवढेच प्रेम मतावरही करा.
उल्लेखनीय आहे की यापूर्वीही शरद यादव यांनी राज्यसभेत विमा बिल चर्चेदरम्यान महिलांच्या वर्णावर वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की दक्षिण भारतीय महिला सावळ्या असल्या तरी त्यांचे शरीर सुंदर असतं, त्यांची त्वचा सुंदर असते आणि त्यांना नाचतादेखील येतं.