Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नक्षलवाद्यांनी गयामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांना फासावर लटकावले, घराला बॉम्ब लावून उडवले

नक्षलवाद्यांनी गयामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांना फासावर लटकावले, घराला बॉम्ब लावून उडवले
, रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (14:12 IST)
गया मुख्यालयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवार गावात नक्षलवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली. चौघांनाही घराबाहेर लटकवण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये एकाच घरातील दोन पती-पत्नींचा समावेश आहे.आणि नंतर गावातील लोकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने एक घर बॉम्बने उडवून मोटारसायकल पेटवून दिली.
 
मृतांमध्ये सतेंद्र सिंग, महेंद्र सिंग, मनोरमा देवी आणि सुनीता सिंग यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी एक पत्र लिहून ठेवले आहे या मध्ये म्हटले आहे की,  खुनी, देशद्रोही आणि मानवतेचा घात  करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही. हा त्यांचा अमरेश , सीता, शिवपूजन आणि उदय या चार साथीदारांच्या हत्येचा हा बदला आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्याला विष प्राशन करून कटाचा बळी बनवण्यात आले.
 
घटनास्थळी लावलेले पत्रक जन मुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी अधिक सांगू इच्छित नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
 
याप्रकरणी एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, 'निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे  कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले त्याच ठिकाणी ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुष्टी केली की NCA ची जबाबदारी VVS लक्ष्मणच्या खांद्यावर