Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वेचा मोठा निर्णय - या गाड्यांमध्ये मांसाहारी पदार्थ नेण्यास बंदी घालणार, जाणून घ्या का?

रेल्वेचा मोठा निर्णय - या गाड्यांमध्ये मांसाहारी पदार्थ नेण्यास बंदी घालणार, जाणून घ्या का?
नवी दिल्ली , शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (19:56 IST)
लवकरच ट्रेनमध्ये मांसाहारी पदार्थ  (Non veg) घेण्यास बंदी  घालण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांना जाणाऱ्या देशभरातील सर्व गाड्यांमध्ये हा नियम लागू असेल. भारतीय रेल्वेने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा नियम एकाच वेळी लागू होणार नसून एकामागून एक धार्मिक स्थळी जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये लागू केला जाईल. या गाड्यांना सात्विक गाड्यांचे Sattvik trains प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने सात्विक कौन्सिल ऑफ इंडियाशी करार केला आहे. परिषद या गाड्यांना प्रमाणपत्र देईल, त्यानंतर गाड्या सात्विक होतील.
ट्रेनमध्ये प्रवास करणारे बरेच प्रवासी ट्रेनमध्ये दिलेले अन्न खात नाहीत कारण त्यांना हे माहित नसते की ते अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी आहे. म्हणजेच जेवण बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली, व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे शिजवले गेले, जेवण बनवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंतची प्रक्रिया काय आहे. प्रवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय रेल्वे एक नवीन उपक्रम सुरू करणार आहे. IRCTC ने भारतीय सात्विक कौन्सिलशी करार केला आहे की, अन्न पूर्णपणे शाकाहारी असावे आणि ते बनवताना स्वच्छतेचे सर्व मानक लक्षात घेतले जावेत.
 
या गाड्या सात्विक असतील
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सात्विक करण्याची तयारी सुरू आहे. कारण धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये बहुसंख्य लोक हे भाविक असतात जे पूर्ण श्रद्धेने आणि श्रद्धेने दर्शनासाठी जात असतात. त्यादरम्यान प्रवाशांच्या आजूबाजूला बसलेल्या व्यक्तीने मांसाहार केला तर दर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो.
 
उदाहरणार्थ, वैष्णोदेवीला जाणारी वंदे भारत असो किंवा भगवान श्री रामाच्या संबंधित स्थानांना भेट देणारी रामायण स्पेशल ट्रेन असो, त्यात प्रवास करणारे बहुतेक प्रवासी असे असतील की ज्यांना पूर्णपणे सात्विक जेवण करायला आवडेल. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने त्याची सुरुवात केली जात आहे. याशिवाय रामायण स्पेशल ट्रेन, वाराणसी, बोधगया, अयोध्या, पुरी, तिरुपती यासह देशातील अन्य धार्मिक स्थळांना जाणाऱ्या गाड्या सात्विक बनवण्याची तयारी सुरू आहे.
 
सात्त्विक काउन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक अभिषेक बिस्वास सांगतात की, सात्विक प्रमाणपत्र देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया कराव्या लागतील. यामध्ये स्वयंपाकाची पद्धत, स्वयंपाक घर, खाण्यासाठी लागणारी भांडी, सर्व्ह करण्याची पद्धत, ठेवण्याची पद्धत ठरवली जाईल, सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाईल. ते म्हणाले की, गाड्या सात्विक करण्यासोबतच बेस किचन, लाउंज आणि फूड स्टॉलही सात्विक करण्याची योजना आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hyundai Ionic 5 Electric SUV, 301bhp चाचणी दरम्यान दिसली, 301bhp पॉवरसह 481 किमी पर्यंतची रेंज