Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला चार मुले झाली हा काँग्रेसचाच दोष - रवी किशन

ravi kishan
, शनिवार, 10 डिसेंबर 2022 (08:27 IST)
“काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक यापूर्वीच आणलं असतं, तर आज मी 4 मुलांचा बाप नसतो,” असं वक्तव्य भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी केलं आहे.
 
आज तकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर देशात चर्चा सुरू आहे. खासदार रवी किशन हे सातत्याने याविषयी भूमिका मांडताना दिसतात. याविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं रवी किशन म्हणाले.
 
ते म्हणाले, “मला चार मुले आहेत, ही काही चूक नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती. चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारशील असती तर पिढ्याना त्रास झाला नसता.”
Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs AUS T20 : पहिल्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 गडी राखून विजय मिळवला