Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'हर घर तिरंगा' उपक्रमासाठी मोदींचं जनतेला आवाहन

modi
, शनिवार, 23 जुलै 2022 (09:15 IST)
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे. याच अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजिन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
 
यावेळी ट्विट करून नरेंद्र मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करतो की, येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी."
 
ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे सरकारवर एकनाथ खडसेंची टीका, 'डिलिव्हरीचा मुहूर्त दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?'