Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस शेवटच्या घटका मोजत आहे: मोदी

काँग्रेस शेवटच्या घटका मोजत आहे: मोदी
जालंधर- काँग्रेस हा पक्ष सध्या शेवटच्या घटका मोजत असून सत्तेविना या पक्षाची अवस्था पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशासारखी झाल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जी बोट बुडाली आहे, ज्या बोटीत आता काहीच उरले नाही अशा बोटीमध्ये पंजाबची जनता पाय ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंजाबमध्ये अकाली दल- भाजप युतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
 
पंजाबमधील तरूणाई अमील पदार्थांच्या विळख्यात अडकली असून यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर मोदी यांनी प्रत्युत्तर दिले की पंजाब ही वीरांची भूमी आहे. पंजाबची आन बान आणि शानमुळे देशाची मान अभिमानाने उंचावते असे सांगत मोदी म्हणाले, काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी पंजाबमधील तरुणंची प्रतिमा मलिन केली, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशियाच्या भारतातील राजदूताचे निधन