Publish Date: Tue, 01 Apr 2025 (15:22 IST)
Updated Date: Tue, 01 Apr 2025 (15:27 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून सहावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम करून "मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध भारत" निर्माण करत आहे, असे शाह म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, भारत ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी वचनबद्ध आहे. शाह यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, आज आपल्या देशाने डाव्या अतिरेकीवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून फक्त सहा पर्यंत कमी करून एक नवीन टप्पा गाठला आहे.
Edited By- Dhanashri Naik