Publish Date: Wed, 27 May 2020 (11:16 IST)
Updated Date: Wed, 27 May 2020 (11:18 IST)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीविषयी बोलताना राज्यात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, भाजपकडून झालेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजपला उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, हे राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.