Publish Date: Fri, 11 Nov 2022 (15:16 IST)
Updated Date: Fri, 11 Nov 2022 (15:21 IST)
राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर नलिनी श्रीहरन यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नलिनी म्हणाल्या, मी दहशतवादी नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे निवडणूक रॅलीदरम्यान हत्या करण्यात आली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनी म्हणाली, मला माहीत आहे, मी दहशतवादी नाही. मी इतकी वर्षे तुरुंगात होते. गेले 32 तास माझ्यासाठी संघर्षमय होते. ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. विश्वास ठेवल्याबद्दल मी तामिळनाडूच्या लोकांचे आणि सर्व वकिलांचे आभार मानतो.' नलिनी श्रीहरन आणि आर. पी. रविचंद्रन यांनी मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलनच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निकालही या दोन्ही प्रकरणांमध्ये लागू आहे. राज्यघटनेच्या कलम-142 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा पूर्ण केलेल्या पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.
महिला आत्मघाती बॉम्बरचा वापर करण्यात आला
माजी पंतप्रधानांच्या हत्येसाठी धनू नावाच्या महिला आत्मघातकी बॉम्बरचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात माजी पंतप्रधानांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या तपासात सात जण दोषी आढळले. ज्यामध्ये एका दोषी पेरारीवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु मे महिन्यात त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले होते.
Edited by : Smita Joshi