एका बाजूला युतीचे काय होतय या कडे लक्ष आहे तर दुसरीकडे आता आघाडी कोन्ग्रेस-राष्ट्रवादीत वाद सुरु झाले आहेत. यामध्ये सर्वात मोठ्या महापालिका असलेल्या मुंबईत आघाडी अशक्य असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम बोलले आहेत. आमचं वेगळं लढायचं ठरलं असून राष्ट्रवादीचीही तीच भूमिका आहे असंही संजय निरुपम यांनी सांगितलं आहे. आघाडी होऊ नये याबाबत मुंबईच्या नेते-कार्यकर्त्यांची भूमिका ठाम असल्याचं निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे आता नेमकी आघाडी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मात्र राष्ट्रवादीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.