Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींनी पीएम मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भडकले शिवराज सिंह म्हणाले-परदेशात देशाची प्रतिमा खराब करणे देशद्रोह

राहुल गांधींनी पीएम मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भडकले शिवराज सिंह म्हणाले-परदेशात देशाची प्रतिमा खराब करणे देशद्रोह
, मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (14:18 IST)
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. व तिथे ते सतत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहे. सोमवारी व्हर्जिनियाच्या हर्नडन मध्ये इंडियन ओवरसीज काँग्रेस सोबत जोडलेले कार्यक्रमामध्ये संबोधित करीत राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर पीएम मोदी यांची घाबरवण्याची रणनीती लागलीच गायब झाली आहे. तसेच ते म्हणाले की मोदींची घाबरवण्याची रणनीती फक्त निवडणुकीपर्यंतच मर्यादित होती. निवडणूक संपताच ती गायब झाली. आता भीती नाही वाटत आता भीती निघून गेली.
 
तसेच राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले की, ''राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेता आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्याचे पद जवाबदारीचे असते. मी राहुल गांधींना आठवण देऊ ईच्छीतो की, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा नरसिंह राव पंतप्रधान होते. तेव्हा अनेक प्रकरणामध्ये भारताचे नेतृत्व अटल बिहारीजी करायचे. त्यांनी कधीही देशाच्या बाहेर देशाची प्रतिमा डागाळली नाही. तसेच शिवराज सिंह म्हणाले की, राहुल गांधी हे एक असे नेता आहे जे सतत तिसऱ्यांदा हरल्यामुळे त्यांच्या मनात भाजप आणि मोदींविरुद्ध विरोध निर्माण झाला आहे. जे विरोध करता करता आता देशाचा बाहेर जाऊन विरोध करीत आहे. देशाच्या बाहेर काँग्रेस आणि भाजप नाही आहे. देशात राहून आपण या मुद्द्यांवर वाद घालू शकतो. राहुल गांधी देशाच्या बाहेर देशाचे प्रतिमा खराब करीत आहे. तसेच देशाची प्रतिमा खराब करणे हे देशद्रोह मध्ये येते. राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रा तर करतात पण ते कधीही भारताशी जोडले गेले नाही आणि जनतेशी देखील जोडले गेले नाही. तसेच येथील संस्कृती, जीवनमूल्य, परंपरा यांच्याशी देखील जोडले गेले नाही. राहुल गांधींचा हा व्यवहार दुर्भाग्यपूर्ण आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा