Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव, आळंदीत 7 दिवस संचारबंदी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव, आळंदीत 7 दिवस संचारबंदी
, रविवार, 27 जून 2021 (17:48 IST)
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
 
देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.
 
या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे.
 
देहू, आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने, तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी! डेक्कन एक्स्प्रेसचे विस्टाडोम कोचसह नवीन रूप