Publish Date: Tue, 17 Sep 2024 (10:33 IST)
Updated Date: Tue, 17 Sep 2024 (10:36 IST)
महाराष्ट्रातील पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका व्यावसायिकाने पत्नीशी भांडण झाल्यावर रागाच्या भरात घर सोडले आणि नंतर नदीत उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी मृताने त्याचे शेवटचे लोकेशन पत्नीला पाठवले होते. ही घटना रविवारी सकाळी घडल्याचे पुणे पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार सुक्या फराळाचा व्यवसाय करणारे श्रीकांत देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्यात पुण्यातील धनकवडी येथील त्यांच्या घरी काही गोष्टीवरून जोरदार वाद झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांनी देशमुख यांनी आत्महत्या केल्याची बातमी मिळाली.
रविवारी रात्री अकराच्या सुमारास श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह पोस्टमोर्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून देशमुख यांच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे. देशमुख यांच्या पश्चात पत्नी व दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.
Edited By- Dhanashri Naik