Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘..तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’; अजित पवारांचा इशारा

‘..तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’; अजित पवारांचा इशारा
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:32 IST)
शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी  अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही. असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पीक विम्याबाबत प्रतिक्रिया दिली आणि विमा कंपन्यांना थेट इशारा दिला आहे.
 
त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, पुढे ते म्हणाले, आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाहीये. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कष्टक-याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे.असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारायण राणेंचा CM ठाकरेंवर घणाघात; म्हणाले – ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म, आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’