Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार

विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार
, गुरूवार, 9 मे 2019 (10:03 IST)
भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुढच्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात बोलताना जाहीर केलं.
 
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सर्व उमेदवार स्वबळावर उतरवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागांची पूर्तता न करु शकल्याने ही आघाडी होऊ शकली नाही. आता चर्चेच्या अगोदरच प्रकाश आंबेडकरांनी भूमिका जाहीर केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राणे यांच्या आत्मचरित्रातून राज ठाकरेंबद्दल दोन मोठे खुलासे