Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावती बंदला हिंसक वळण; शहरात संचारबंदी लागू

अमरावती बंदला हिंसक वळण; शहरात संचारबंदी लागू
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (16:28 IST)
शुक्रवारी झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ अमरावतीत आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून अमरावती बंद पुकारण्यात आला. या दरम्यान शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या.
 
जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
अमरावतीत आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून अमरावती बंद पुकारण्यात आला. सकाळी भाजपचे कार्यकर्ते राजकमल चौकात जमले आणि मोर्चा काढला.
 
त्रिपुरात घडलेल्या घटनेनंतर काल विशिष्ट समुदायाकडून अमरावती शहरात झालेल्या तोडफोड करण्यात आली होती.
 
दरम्यान, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून  पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केल्या. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
बंदमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली असून बंदला हिंसक वळण लागले आहे. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे.
 
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे.
 
या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.
 
पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कठोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
दरम्यान पक्ष कोणताही असो शांतता ठेवावी अस आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी कर्जमाफीत अहमदनगर जिल्ह्याचा नंबर पहिला