Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, संतप्त माकडांच्या टोळीने घेतला 250 कुत्र्यांचा जीव

काय सांगता,  संतप्त माकडांच्या टोळीने घेतला 250 कुत्र्यांचा जीव
, रविवार, 19 डिसेंबर 2021 (12:35 IST)
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या लवूळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावात  3 महिन्यापासून संतप्त माकडांच्या टोळीने 250 कुत्र्यांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. ही सर्व माकडं कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या पकडलेल्या कुत्र्याला खाली टाकून देतात.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. आता या गावात कुत्र्याचं एकही पिल्लू उरले नाही. 

माकडांच्या या उच्छादानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. बीडच्या वनविभागाचे अधिकारी सचिन कांड यांनी सांगितले की ,  वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांनी या माकडांच्या टोळीतील दोन माकडांना पकडले आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात येणार आणि नंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BWF World Championships 2021: किदाम्बी श्रीकांतने इतिहास रचला , लक्ष्य सेनला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केले