Publish Date: Fri, 03 Apr 2026 (11:02 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2026 (11:04 IST)
सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला असून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे तसेच कलम १४४ लागू करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या अंजनगाव खेळोबा गावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन गटांमधील संघर्षामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. रात्री अचानक पुतळा बसवल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, गावात सामाजिक तणावाचे वातावरण तयार झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अंजनगाव खेळोबा येथे संतप्त लोकांनी माढा तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक केली, ज्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. मूर्तीच्या स्थापनेवरून सुरू झालेला वाद रात्री चिघळला, जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. यावेळी तहसीलदारांच्या वाहनालाही लक्ष्य करण्यात आले. सध्या गावात तणावपूर्ण परिस्थिती असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik