Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान आणि इतर लोकहो लोकभावना महत्वाची - मुख्यमंत्री

सलमान आणि इतर लोकहो लोकभावना  महत्वाची - मुख्यमंत्री
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (17:24 IST)
भारतामध्ये पाकिस्तानविरोधात रोषाचे वातावरण आहे. तर भारता विरोध आपक आपल्या चुकीच्या कारवाया सुरूच ठेवून असून , आपल्या देशाचे वीर जवान सीमेवर आपले प्राण देवून आपले रक्षण करत आहे. त्यामुळे आपल्या देशातील  सर्वसामान्य भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांनी इथं काम करायला नको आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खान किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा,' असे स्पष्ट  मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 
 
एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीला  मुलाखत देताना देवेंद्र  फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.  प्रत्येकाला वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं मत जाहीर व्यक्त करणं असंवेदनशील ठरू शकतं, मात्र आता ही स्थिती असताना आणि देशप्रेमी जनतेच्या विरोधात कोणी ही बोलू नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भरवस्तीती फटका दुकानांना आग २०० दुकाने जळाली