Publish Date: Sat, 14 Jan 2017 (15:32 IST)
Updated Date: Sat, 14 Jan 2017 (15:34 IST)
राज्यातल्या दहा महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच लीड दिली असून ते जे सांगतील तशीच पालिका नीती ठरवून भाजपा महापालिका निवडणुका लढवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शहरी विकासावर लक्ष केंद्रीत करुन शहरांमधल्या विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे. अनेक सभांमधून मुख्यमंत्री केवळ शहरी विकासावर भर देत असून प्रचारातल्या पुढच्या काळात ते अजून सक्रीय होण्याची शक्यता आहे.
मुंबईसारख्या शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरकडे फडणवीसांचं बारकाईने लक्ष आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून किती निधी देणार, कोणते प्रकल्प राबवणार हेच मुख्यमंत्री आपल्या सभांमधून मांडत आहेत. तर भाजपा कसा फरक कसा निर्माण करू शकते आणि इतर पक्षा पेक्षा कसे सरस आहेत हे भाजपने दाखवून दिले आहे असा प्रचार ते करत आहेत.तर त्यांच्या पक्षातील मंत्री जरी अनेक विवादात अडकले असतील मात्र फडणवीस हे सर्व गोष्टी पासून अलिप्त आहेत.याचच फायदा पक्ष करून घेणार आहे.