Publish Date: Tue, 08 Nov 2022 (12:17 IST)
Updated Date: Tue, 08 Nov 2022 (12:21 IST)
एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांमध्ये मुंबईत सर्व समर्थक आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनंही केली आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढल्यानंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कान टोचले. अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करुन माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहिररीत्या माफी मागितली.
Published By -Smita Joshi