Publish Date: Mon, 29 Apr 2019 (10:29 IST)
Updated Date: Mon, 29 Apr 2019 (10:31 IST)
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान रविवारी अकोल्यात नोंदवण्यात आले. अकोल्याचे तापान 47.2 अंश नोंदवण्यात आले आहे. तर वर्ध्यातही तापानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्येही 47 अंशाच तापानाने उच्चांक गाठला आहे.
अकोल्यात शनिवारी 46.7 अंश तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापानाची नोंद करण्यात आली, किमान तापान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा अधिक वर चढणार आहे.