Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरमध्ये भाज्या महाग झाल्या, भाज्यांचे दर दुप्पट झाले

नागपूरमध्ये भाज्या महाग झाल्या, भाज्यांचे दर दुप्पट झाले
, शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (16:59 IST)
नागपुरमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आठ दिवसांत किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार आहे. 
 
पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. शहरातील रामदारसपेठ भाजी बाजारात फुलकोबी 120 रुपये, दोडका 120 रुपये, मेथी 160 रुपये, कोथिंबीर 100 रुपये, टोमॅटो 80 रुपये, तर वांगी 70 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.  आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्याचं मत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी- खासगी गाड्या (Private Train) स्वतःचे भाडे ठरवतील, सरकार सूट देईल