Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतातील आगीत १२० पेक्षा अधिक प्राणी जळून मृत

शेतातील आगीत १२० पेक्षा अधिक प्राणी जळून मृत
नागपूर येथील असलेल्या धारापुर सुकळी गावात  शेतात लागलेल्या आगित किमान ७० बकऱ्या ५० कोंबड्या आणि ४ गायी जळून खाक झाल्या.तर सोबतच जवळ असलेल्या १० म्हशीसुद्धा भाजल्या गेल्या.  धारापुर गवळी गावात दिगंबर ढोक याचं गांवालगत शेत आहे.  शेळी व कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे.  

मध्यरात्री या गोठ्यात अचानक आग लागल्याची बातमी गावात पसरली मात्र गांवापासून या गोठ्याच अंतर  लांब असल्याने गोठ्यापर्यंत पोहचायला उशीर झाला त्यामुळे  मुक्या जनावरांचा मृत्यु झाला. ही आग शार्ट सर्किटमुळे लागली किंवा कुणी हेतु पुरस्कर लावली या संदर्भात हिंगणा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचे आकाश आणि चीनला धक्का