Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र बंद 2024: 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का?

महाराष्ट्र बंद 2024: 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का?
, शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (11:52 IST)
महाराष्ट्र बंद 2024: 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का? या दिवशी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 'बंद'ची घोषणा केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेत दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद' जाहीर केला आहे. तसेच या घोषणेनंतर राज्यातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, 24 ऑगस्ट रोजी शाळा, महाविद्यालये, बँका बंद राहणार का?
 
महाराष्ट्र बंदला कोणाचं समर्थन?
MVA मित्रपक्ष काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनायुबीटी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP  या बंदला पाठिंबा देत आहेत. तसेच शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील लोक नाराज असून आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर घटनेच्या निषेधार्थ MVA 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन देणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे सरकार असंवैधानिक आहे. महाराष्ट्र बंद आवश्यक आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, बदलापूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही 24 ऑगस्टला बंदचे आवाहन दिले आहे.
 
24 ऑगस्टला शाळा-कॉलेज बंद राहणार का?
तसेच याबद्दल सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता कमी आहे. पण, ज्या संस्था शनिवारी बंद असतात, त्या बंदच राहतील.
 
बस आणि मेट्रो धावणार नाही का?
विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी महाराष्ट्र सरकारने अद्याप बस आणि मेट्रोबाबत कोणतीही सूचना जारी केलेली नाही. यामुळे बस आणि मेट्रो सामान्यपणे धावणे अपेक्षित आहे.
 
बँका बंद राहणार का?
 24 ऑगस्ट शनिवार रोजी देशभरातील बँका बंद राहतील, कारण हा महिन्याचा चौथा शनिवार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, बँका दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार, राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बंद राहतात.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्रिपुरामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे उद्रेक, 22 जणांचा मृत्यू