Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र सरकार विशाळगड किल्ल्याचे अतिक्रमण मुद्दे सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे-उपमुख्यमंत्री फडणवीस

devendra fadnavis
, बुधवार, 17 जुलै 2024 (09:59 IST)
महाराष्ट्रातील कोल्हापुर मधील विशाळगड किल्ल्यात अतिक्रमण काढण्यासाठी पोहचलेल्या पोलीस प्रशासन टीम वर तेथील नागरिकांनी दगडफेक केली आहे. या घटनेच्या आरोपाखाली पोलिसांनी 500 लोकांविरोधात केस दाखल केली आहे. या घटनेला घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पुढे आला आहे. ते म्हणाले की,अतिक्रमण मुद्द्याला कायद्याने ऊपाय काढण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध आहे. 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण आणि बेकायदेशीर निर्माण एक जुना मुद्दा आहे. जो पूर्व राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे व्दारा बेकायदेशीर निर्माण विरुद्ध आवाज उठवल्यामुळे परत समोर आला आहे. 
 
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण विरोधी अभियान रविवारी हिंसक बनले. जेव्हा जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि संपत्तीला नुकसान केले. या प्रकरणात 21 लोकांना अटक करण्यात अली आहे. स्थिती तेव्हा तणावपूर्ण झाली जेव्हा पुण्यामधून आलेल्या मराठा राजघराण्याचे पूर्व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये काही दक्षिण पंथी कार्यकर्त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी थांबवण्यात आले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mumbai Hit and Run: मिहीर शाहला 30 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी