Publish Date: Mon, 30 Jun 2025 (21:48 IST)
Updated Date: Mon, 30 Jun 2025 (21:48 IST)
महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक 'मी मराठी' असा नारा देत असल्याचे दिसून आले. याशिवाय, सभागृहात पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी ५७,५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून रोजी सुरू झाले. पावसाळी अधिवेशन १८ जुलैपर्यंत चालेल. सोमवारी, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ५७,५०९.७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यामध्ये, नाशिक कुंभाच्या तयारीसाठी एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचा प्रत्यक्ष निव्वळ आर्थिक भार ४०,६४४.६९ कोटी रुपये असेल असा दावा करण्यात आला आहे.
तसेच पावसाळी अधिवेशनात मंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये राज्यातील रस्ते, मेट्रो, सिंचन योजना, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि समाजातील वंचित आणि कमकुवत घटकांच्या विकासासाठी निधीचा वापर यांचा समावेश आहे.
Edited By- Dhanashri Naik