Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Political Crisis उद्धव ठाकरे सरकार पडणार? या प्रश्नावर शरद पवार यांचे उत्तर

sharad panwar
, मंगळवार, 21 जून 2022 (17:05 IST)
Sharad Pawar Press Conference: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे सरकार चांगले चालले असल्याचा दावा केला. यासोबतच ते म्हणाले की, जे काही घडत आहे, ते सरकार स्थापन झाल्यापासून तिसऱ्यांदा घडत आहे.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, 'महाराष्ट्रात आमचे सरकार चांगले चालले आहे. आता जे काही घडले ते अडीच वर्षांत तिसऱ्यांदा घडले आहे. याआधीही आमच्या आमदारांना हरियाणात बोलावून ठेवण्यात आले होते, पण नंतर आम्ही सरकार स्थापन केले आणि सरकार व्यवस्थित सुरू आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, 'तिन्ही पक्षांची मुख्य जबाबदारी शिवसेनेची आहे. तिथे कोणाला संधी देणे, ही त्यांची अंतर्गत बाब आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोणता ही बदल करण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
 
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले की, आमचा एकही उमेदवार एमएलसी निवडणुकीत जिंकू शकला नाही. मी येथे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहे, परंतु आम्ही परत गेल्यावर एमएलसी निवडणुकीबद्दल नक्कीच बोलू. यासोबतच ते म्हणाले की, क्रॉस व्होटिंगची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही असे घडले आहे.
 
मी अद्याप एकाही आमदाराशी बोललो नाही. यासोबतच शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्र आहोत, असेही ते म्हणाले. शिवसेना काय अडचण सांगणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पुढे म्हणाले की, संध्याकाळी शिवसेनेची भेट घेणार, मग कळेल काय अडचण आहे?
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात तमाशा, पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले