जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील शेतकरी महादू बारकू जाधव (52) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर २०१७ या वर्षात जिल्ह्यात जवळपास 17 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
तालुक्यातील गिगाव येथे जाधव यांची गट नं. 56/1/91 आर तर गट नं 55/1 पैकी 40 आर शेतजमीन आहे. जाधव हे निलूबाई जाधव यांच्या घरात भाड्याने राहत होते. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.