Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
, रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:16 IST)
काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला तणाव स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या सहकारी म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळं त्या रंग बदलून परत कधी मोदींबरोबर जातील हे सांगता येणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि युपीएवर टीका केली होती. मात्र देशभरात पसरलेला आणि अस्तित्व असलेला केवळ काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळं भाजपविरोधात आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही, असंही चव्हाण म्हणाले.
सध्या मोदींच्या विरोधात होत असलेली सर्वपक्षीय एकजुट कमकुवत करण्याचा प्रयत्न ममता करत आहेत. त्याचा फायदा केवळ मोदींना होईल, असंही ते म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित शहांचा शेतकरी नेत्यांना फोन, चर्चेतून आंदोलनाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता