Publish Date: Mon, 06 Jan 2025 (16:59 IST)
Updated Date: Mon, 06 Jan 2025 (18:00 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे विरोधकांच्या तोंडावर चपराक असल्याचे वर्णन केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका करणाऱ्या नेत्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंच्या गटाचे अनेक नेते शिवसेना मध्ये सामील झाल्यावर त्यांनी शिवसेना यूबीटीचे नेत्यांचे त्यांच्या पक्षात स्वागत केल्यांनतर विधान केले. शिंदे यांनी दावा केला की शिवसेनेचे अनेक नेते आपल्या गटात सामील झाल्याने आपला पक्ष मजबूत होत असल्याचे दिसून येते
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, 'महायुती', भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांच्या युतीने राज्यातील 288 पैकी 230 जागा जिंकल्या, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (UBT) केवळ 20 जागा मिळाल्या, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. ज्यांना जनता साथ देईल, असा विश्वास असलेल्यांच्या तोंडावर चपराक असल्याचे शिंदे यांनी निकालाचे वर्णन केले.
विरोधकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत ते म्हणाले की , ज्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. त्यांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास झाला आणि राज्याची प्रगती झाली.
शिंदे म्हणाले. शिवसेना (यूबीटी) नेत्यांचे शिवसेनेत येणे हे पक्षाची वाढती ताकद आणि सततचे यश दर्शवते.