Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत शनिवार व रविवारी मोर्चे काढा, वाहतूक कोंडी अधिक होणार नाही

maratha aarakshan
, बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:57 IST)
लोकशाहीत मोर्चे व आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार व रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी अधिक होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मंत्रालयापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मोर्चे आझाद मैदानात थांबवा, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट रहिवाशी संघाने केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दिवसेंदिवस मोर्चांची संख्या वाढत आहे. राज्यभरातून निघणारे मोर्चे थेट आझाद मैदानावर येऊन धडकतात. याला निर्बंध घालणे आवश्यक आहे, अशी मागणी अॅड.एस. सी. नायडू यांनी केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशाला कुणा एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य मिळालेले नाही - पंतप्रधान