Publish Date: Thu, 23 Jun 2022 (21:04 IST)
Updated Date: Thu, 23 Jun 2022 (21:08 IST)
कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आ. पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायच हिंदुत्व, खरतर ईडीकाडीची भीती. गद्दारांना क्षमा नाही ऐकल होते ठाण्यात. ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात.