Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र : गरबा, दांडिया आणि दसऱ्यासाठी 'हे' आहेत नवे नियम

नवरात्र : गरबा, दांडिया आणि दसऱ्यासाठी 'हे' आहेत नवे नियम
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (15:33 IST)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच सण-उत्सव कोव्हिड-19 निर्बंधांसह साजरे करणं आता अनिवार्य बनलं आहे.येत्या 7 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. या निमित्ताने मुंबई महापालिकेनंतर गृहविभागाने नागरिकांना नवरात्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केली आहे.
 
प्रशासनाने गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व नागरिकांनी या सूचना पाळूनच उत्सव साजरा करावेत,
नियमांचा भंग केल्यास अशा व्यक्तींविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गृहविभागाच्या सूचना
* सार्वजनिक मंडळांनी नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने केवेळ मर्यादित स्वरुपाचे मंडळ उभारावे.
* सार्वजनिक मंडळांकरता देवीची मूर्ती 4 फूट उंच आणि घरगुती मूर्ती 2 फूट उंच असावी.
* गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम ( उदा. रक्तदान शिबीर) राबवण्यास प्राधान्य द्यावे.
* देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कद्वारे करण्यास प्रधान्य द्यावं.
* देवीच्या दर्शनासाठी येताना भक्तांनी सुरक्षित अंतर आणि नियमांचे पालन करावं.
* भजन, आरती, किर्तन किंवा इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसंच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
* मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना परवानगी नसेल.
* मंडपात खाद्यपदार्थ किंवा पेयपान आयोजित करता येणार नाही.
* देवीचे आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढण्याची परवानगी नाही. विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. * ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी याठिकाणी जाणं टाळावं.
* स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात विसर्जन करता येणार नाही.

दसऱ्यासाठी सूचना
* दसऱ्यादिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम नियम पाळून करावा.
* रावण दहनासाठी आवश्यक असणाऱ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी असतील.
* याठिकाणी प्रेक्षकांना बोलवण्याची परवानगी नसेल.
* समाज माध्यमातून प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी.
 
मुंबई महानगरपालिकेने काय म्हटलं?
मुंबई महापालिकेने गुरुवारी (30 सप्टेंबर) सार्वजनिक नवरात्रोत्सव 2021 संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. यामधील माहितीनुसार,
 
* नवरात्रोत्सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक.
* देवी-मूर्तींची सजावट करताना भपकेबाजी नसावी.
* देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट तर घरगुती मूर्तींकरिता 2 फूटांपेक्षा जास्त नसावी.
* शक्यतो घरातील देवींच्या मूर्तींचेच पूजन करावे.
* घरगुती देवीमूर्तींचे आगमन/विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपात नसावे, जास्तीत जास्त 5 व्यक्तींना परवानगी. सर्वांनी * कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.
* सार्वजनिक मंडळांच्या देवी आगमन आणि विसर्जन 10 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
* सर्वांनी कोरोना लशीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस पूर्ण झालेले असावे.
* नवरात्रोत्सवात गरब्याचं आयोजन करण्यात येऊ नये.
* आरती, भजन, किर्तन करताना नियमांचा भंग होणार नाही आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
* गरबा, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत (उदा. रक्तदान शिबीर, मलेरिया, डेंग्यूबद्दल जनजागृती)
* देवीमूर्तींचे दर्शन ऑनलाईन, केबल किंवा फेसबूकवर उपलब्ध करून द्यावे.
* मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियम पाळणे बंधनकारक.
* मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीनवेळा निर्जुंतुकीकरण.
* आरोग्य विषयात आणि सामाजिक संदेश देणार्या जाहीरातींना पसंती द्या. व्यावसायीक जाहिराती शक्यतो नको.
* मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते नसतील, याची खबरदारी घ्यावी.
* कोरोनासंदर्भात नियमांचे पालन होत असल्याचं पाहण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची.
* आरतीच्या वेळी 10 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असू नयेत.
* देवींच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नये. कमीत कमी वेळेत, कमी लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडावा.
* एखादं घर किंवा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केल्यास त्यासंदर्भात नियमांचे पालन करावे.
* नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध संसर्गजन्य रोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भा. दं. वि. 1860 नुसार कठोर कारवाई.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियंका गांधी यांना काँग्रेस उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित का करत नाही?