Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नियोजन करा, लोकांना दिलासा द्या, केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही : आठवले

नियोजन करा, लोकांना दिलासा द्या, केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही : आठवले
, शनिवार, 24 एप्रिल 2021 (09:13 IST)
नाशिकची घटना दुर्दैवी असून राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. विरारची घटनाही धक्कादायक असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते राज्यातील परिस्थिती जास्त खराब आहे.  राज्यातील मंत्र्यांनी विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्यातील रुग्णांना कसा दिलासा देता येईल यासाठी प्रयत्न करावा. राज्यसरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. राज्यसरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य नियोजन केले नाही. केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही, नियोजन करा, लोकांना दिलासा द्या. केंद्र सरकारही उपाययोजना करतेय असेही त्यांनी सांगितले.
 
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी दुर्घटनास्थळाची केली पाहणी केली. त्यानंतर  संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनांची चौकशी करा,दोषींना शासन करा असेही सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रतिमहा दहा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट, आयुक्तांच्या बैठकीत निर्णय