rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपमुख्यमंत्री शिंदेंनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित परत येण्याचे आश्वासन दिले

Maharashtra News
, गुरूवार, 11 सप्टेंबर 2025 (08:01 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधला आणि त्यांना सुरक्षित भारतात परत येण्याचे आश्वासन दिले. 
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सुमारे १५० पर्यटक नेपाळमध्ये विविध ठिकाणी अडकले आहे आणि तेथील परिस्थितीमुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि भारत सरकारचे संबंधित विभाग पर्यटकांच्या सुरक्षित परत येण्याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पर्यटकांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की, कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत केली जाईल.
एकनाथ शिंदे म्हणाले, "आमचे पर्यटक आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. आवश्यक ती सर्व संसाधने आणि मदत तातडीने पुरवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे." त्यांनी माहिती दिली की, राज्य सरकार आणि भारत सरकारच्या सहकार्याने पर्यटकांच्या सुरक्षित परत येण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी पावले उचलली जात आहे. 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

National Forest Martyrs Day 2025 राष्ट्रीय वन शहीद दिन