Publish Date: Sat, 11 Nov 2017 (16:34 IST)
Updated Date: Sat, 11 Nov 2017 (16:42 IST)
एक दिवसापासून कॉलेज मधून बेपत्ता झालेल्या मनिषा पटले (वय १७) आशना रोकडे (वय १७) या दोघा मुलीनी सोबत आत्महत्या केली आहे. यामध्ये मनिषा आणि आशना या दोघीही नागपूर येथील जरीपटक्यातील लहानुजीनगरात रहिवासी आहेत. या दोघी मैत्रिणी दयानंद महाविद्यालयात ११ वीत शिकत होत्या. या दोघी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जात आहोत, असे घरी सांगून घरून निघाल्या होत्या. मात्र रात्र झाली तरी त्या परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली होती. त्यांनी त्या दोघींचे ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस केली होती. मात्र यश आले नाही. घाबरलेल्या पालकांनी जरीपटका ठाण्यात तक्र ार नोंदवली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.यामध्ये दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास कोराडी तलावात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघींनी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीती.या दोघी शाळेपासून एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या.