Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुकाणू समितीचा इशारा, 15 ऑगस्टला ध्वजारोहण करु देणार नाही

सुकाणू समितीचा इशारा, 15 ऑगस्टला ध्वजारोहण करु देणार नाही
, सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:10 IST)

शेतकरी आंदोलन करणाऱ्या सुकाणू समितीने  पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. यात 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही. 14 ऑगस्टला राज्यभर चक्का जाम करु, असा सांगितले आहे. 

मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

कर्जमाफी करा आणि मगच ध्वजारोहण करा, असं सुकाणू समितीने सांगितलं. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता एन डी ए मध्ये अधिकृत रीत्या सामील व्हा नितीश कुमार - अमित शहा