Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा
, मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (09:22 IST)
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहेत्क. सोबतच  ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. परिणामी, ठाणेकरांचे पाणी चांगलेच  महागणार असून, महत्त्वाचे म्हणजे मुंबईला ठाण्यातील धरणांमधूनच पाणीपुरवठा होतो आहे.  ठाण्याच्या भरवशावरच तहान भागवायची आणि ठाणेकरांवरच दरवाढ लादायची, असा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेने घेतलेल्या या दरवाढ करत , या  निर्णयामुळे वर्षागणिक १४.५८ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. जवळपास  १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील १५० दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम 2018 विधानसभा निवडणुकीचे निकाल