Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे : आदित्य ठाकरे

कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे : आदित्य ठाकरे
, बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:13 IST)
कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत महसुली नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
याआधी मेट्रोची जागा आरे कारशेडवरुन कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्यात आली. त्यानंतर भाजपाने शिवसेनेवर आणि खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. आता कांजूरच्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. त्यामुळे कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, केडीएमसीला दिला इशारा