Publish Date: Sat, 05 Oct 2024 (17:34 IST)
Updated Date: Sat, 05 Oct 2024 (17:37 IST)
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले , "बोटीवर एकूण 14 मच्छीमार होते. त्यांची बोट उलटली, तर अन्य 12 जण सुखरूप बचावण्यात यशस्वी झाले.
रघुनाथ धरमजी (49) आणि आनंद पुंडलिक पराडकर (52) अशी मृत मच्छिमारांची नावे आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. निवती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले .
या बोटीवर एकूण 14 मच्छिमार होते ते मासे पकडण्यासाठी गेले असताना त्यांची बोट उलटली त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला तर 12 सुखरूप बचावले.पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहे.