Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबादच्या दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथे बुडून मृत्यू

औरंगाबादच्या दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथे बुडून मृत्यू
, मंगळवार, 10 जानेवारी 2023 (07:56 IST)
सहलीसाठी रायगडमधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबादचे दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. चार विद्यार्थी समुद्रात बुडाले, यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल काशीद इथे आली होती. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
 
काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरुन विद्यार्थी आनंद घेत होते. त्यापैकी काही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते पाण्यात बुडाले. ही बाब समोर येताच खळबळ उडाली होती. स्थानिक बचाव पथकांनी प्रयत्न केल्यानं दोन जणांना वाचवण्यात आलं आहे. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी भजन म्हटलं तरी लोक मला ट्रोल करतील - अमृता फडणवीस