Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका
, मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:13 IST)
राज्यात सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय लिहिला असून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती आहे अशी जहरी टीका त्यांनी अग्रलेखात केली आहे. अग्रेलेख त्यांनी जमतंय का बघा; नाहीतर सोडून द्या! शिवसेनेचा खिळा असे नाव दिले आहे. सामनात उद्धव ठाकरे म्हणतात की "सरकारी ध्येयधोरणे, भविष्याचा दृष्टिकोन यावर बोलण्यापेक्षा शिवसेनेवर टीका करून व धमक्या देऊन तिसरा वाढदिवस साजरा करायचा असे ‘सरकार’ म्हणविणाऱयांनी ठरवलेच असेल तर आम्ही त्यांना त्या कामीही शुभेच्छाच देत आहोत. वाढदिवसाच्या दिवशी तरी शुभ बोलावे असे हिंदुत्वाचे रीतिरिवाज व संस्कृती आहे व संघ परिवारात पालन-पोषण झालेल्यांनी तरी या संस्कृतीचे भान राखायला हवे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, अखंडतेवर आणि स्वाभिमानावर तुळशीपत्र ठेवून कुणाला राज्य करायचेच असेल तर तो त्यांचा दोष आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही ‘गांडो थयो छे!’ असे म्हणावे लागेल. "
 
शेवटी ते म्हणतात की "विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है!" त्यामुळे अजूनही शिवसेना आणि भाजपा यांच्यात तेढ आहे हे दिसून येतंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन शीर असललेल्या बाळाचा मृत्यू