Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना महापौरांना सवाल

नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना महापौरांना सवाल
, मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:31 IST)
कळवा-खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेले शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
 
महापौर नरेश म्हस्के यांनी फेसबुक पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं. मग जितेंद्र आव्हाड यांनी जुने प्रकरण काढलं.
'जे एक निष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठे बद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले? या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका' असं जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू