Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिंदे गटाने मंत्रीपद का नाकारले नाही? संजय राऊत यांनी सांगितले

sanjay raut
, सोमवार, 10 जून 2024 (17:01 IST)
देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यंदा राष्ट्रवादीतील एकाही नेत्याला स्थान मिळाले नाही.

एनडीएचे सरकारही स्थापन झाले, पण त्यात अजित पवार गटातील एकाही नेत्याचा समावेश नव्हता. शिंदे गटाने राज्यमंत्रिपद का स्वीकारले, तर अजित गटाने पद नाकारले, या बाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 
 
ते म्हणाले, अजित पवार यांच्याकडे 1 जागा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या कडे 7 जागा आहे. हे सर्व लोक विकले गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी आदर म्हणून अजित पवार यांच्या प्रमाणे राज्यमंत्रीपद नाकारले असते यंदाच्या मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही.   
 
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार हे मोदी किंवा भाजपचे नाही तर एनडीएचे आहे. मंत्रिमंडळ किती काळ टिकणार हे पाहणे बाकी आहे. परिस्थिती पाहता हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येत आहे. या भांडणात देशाचे नुकसान झाले आहे.
 
दिल्लीत शपथविधी सोहळा सुरू असताना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा म्हणाले होते की, काश्मीरमध्ये शांतता आहे. जम्मू-काश्मीर आणि मणिपूरची चिंता नाही, त्यांना फक्त सरकार बनवायचे आहे, शेअर बाजार चालवायचा आहे आणि जनतेचा पैसा वाया घालवायचा आहे.
 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींनी पदभार घेता शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीची 17 वा हफ्ता जारी केला