Publish Date: Wed, 30 Oct 2019 (10:54 IST)
Updated Date: Wed, 30 Oct 2019 (10:58 IST)
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
काँग्रेससाठी सर्व पर्याय खुले असल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, शिवसेना-भाजप युतीला बहुतम मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
एकत्रित निवडणूक लढवूनही निकालानंतर शिवसेना-भाजपमध्ये अद्याप धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सेना-भाजपपेक्षा कमी जागा आल्या असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचं महत्त्व वाढलंय.