Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्य ग्रहणाचा काही वस्तू आणि शरीराच्या कोणत्या भागांवर परिणाम होतो जाणून घ्या

सूर्य ग्रहणाचा काही वस्तू आणि शरीराच्या कोणत्या भागांवर परिणाम होतो जाणून घ्या
, मंगळवार, 8 जून 2021 (10:13 IST)
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक कालावधी सुरू होते. चला सुतकाच्या काळात कोणत्या वस्तूंवर त्याचा प्रभाव पडतो जाणून घ्या-
 
1. असे मानले जाते की सूर्यग्रहणादरम्यान त्याचा पाण्यावर प्रभाव पडतो, म्हणूनच तुळशीची पाने पाण्यात घालून ते शुद्ध करतात.
 
2. असेही मानले जाते की अन्नावर ग्रहणाचा परिणाम होतो, म्हणूनच ग्रहण संपल्यानंतरच अन्न शिजवलं जातं आणि खाल्लं जातं, किंवा ग्रहण चालू असताना ताज्या अन्न आणि पाण्यात तुळशीची ताजी पाने घालून सेवन केलं जातं. असेही म्हटले जाते की ग्रहणादरम्यान अन्न खाऊ नये कारण यावेळी पाचन शक्ती कमकुवत असते आणि पोट अशक्त होण्याची शक्यता असते.
 
3. ग्रहण संपल्यानंतर मंदिरे आणि घरे स्वच्छ केली जातात जेणेकरून ग्रहणाचा परिणाम नाहीसा होतो. ग्रहणाच्या वेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात.
 
4. असे मानले जाते की ग्रहणांचा प्रभाव गर्भवतीवर जास्त असतो, म्हणून ग्रहण संपल्यानंतर त्यांना आंघोळ घालण्याचा सल्ला दिला जातो. असे न केल्यास बाळाला त्वचेची समस्या उद्भवू शकते.
 
5. असेही मानले जाते की ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नाही, अन्यथा डोळयातील पडद्यावर याचा विपरीत परिणाम होतो. तथापि, याबद्दल वैज्ञानिक पुष्टीकरण नाही. परंतु हे देखील खरं आहे की ग्रहण उघड्या डोळ्यांनीही दिसत नाही, म्हणूनच ते केवळ एका विशिष्ट प्रकारच्या काळा चष्मा घालूनच दिसतं.
 
6. असेही म्हटले जाते की ग्रहण काळात प्राणी आणि पक्ष्यांच्या वागण्यात बदल होतो.
 
7. असेही म्हटले जाते की ग्रहण वेळी निसर्गातही बदल होतात. ग्रहणांमुळे पृथ्वीच्या आत भूकंप देखील होतात.
 
8. असे म्हणतात की ग्रहणा दरम्यान व्यक्तीला सुस्तपणा किंवा थकवा जाणवतो.
 
9. असेही म्हणतात की ग्रहणकाळात भावनिक व्यक्ती अधिक संवेदनशील होऊन जातात. ग्रहणाचा आपल्या भावनांवर परिणाम होतो आणि नकारात्मक भावनांचा जन्म होतो.
 
10. असेही म्हटले जाते की ग्रहण दरम्यान आपली प्रतिकारशक्ती देखील प्रभावित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर आपण घरात लाकडी वस्तू ठेवत असाल तर 5 वास्तु टिप्स जाणून घ्या