Publish Date: Wed, 10 Mar 2021 (06:50 IST)
Updated Date: Tue, 09 Mar 2021 (22:53 IST)
28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर देखील सावित्रीबाई फुले त्यांच्या अनुयायांसह सतत कार्यमग्न राहिल्या. ज्योतिबांच्या सामाजिक कार्याची अपूर्ण कामे हातात घेऊन सत्य शोधक समाज दूरदूरपर्यंत पसरविला.
1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा उपाय योजला तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. अशा गंभीर परिस्थितीत त्या आजारी लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होत्या. सावित्रीबाई स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा करीत राहिल्या. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.
समाजात तीव्र विरोध असूनही महिलांचे जीवन आणि त्यांना शिक्षण देण्याची जिद तसेच रूढीवादी प्रथा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण योगदान कधीही विसरता येणार नाही. या बद्दल देश नेहमी सावित्रीबाई फुले यांचे ऋणी आहे.