Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप : गृहमंत्री अनिल देशमुख

अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई , शुक्रवार, 8 मे 2020 (07:14 IST)
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार ६९४ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.तसेच राज्यात ९६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ६ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९६ हजार २३१ गुन्हे नोंद झाले असून १८ हजार ८५८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाईचे आदेश
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८९ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबरवर ८५ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात  या १०० नंबरवर ८५ हजार ३०९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६४९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २ लाख २४ हजार २१९ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशीही माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२८१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३ हजार ३३० वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३, पुणे १, सोलापूर शहर १ अशा ५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ४३ पोलीस अधिकारी व ४४४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

रिलिफ कँप
राज्यात एकूण ४ हजार ७३८ हजार रिलिफ कँप आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४ लाख ३५ हजार ३०  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहकार्याचे आवाहन
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली तरी लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेईई एडवांस्ड 2020 परीक्षा 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे