Publish Date: Fri, 30 Dec 2016 (17:19 IST)
Updated Date: Fri, 30 Dec 2016 (17:22 IST)
झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात जमीन खचल्याने कोळसा खणीत भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 40 कामगार अडकल्याची भीती आहे. सोबतच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सध्या एनडीआरएफने बचावकार्य सुरु आहे. कोळसा खणीत काम सुरु होते. मात्र यावेळी जमीन खचल्याने एकच खळबळ उडाली.